24/06/2024
15 जून ,
माझ्या व्यवसायाला म्हणजेच "अश्विनी गृह उद्योग" ला चार वर्षे पूर्ण झाली अश्विनी गृह उद्योग ची सुरुवात अतिशय बिकट परिस्थितीत म्हणजेच कोविडच्या काळात झाली इतके वर्ष आपण जिथे नोकरी करत असतो ते जेव्हा अचानक थांबतं, तेही माझ्या मुलीच्या दहावीच्या काळात. घरातील आणि कामावरील अतिशय मानसिक तणावात न त्यावेळी मी जात होते.. जिथे आपण जिवंत राहू की नाही इतके भीतीचे वातावरण असतानाही जबाबदारी मात्र पाठ सोडत नव्हती अशातच माझ्या जवळच्या एका मित्र परिवारातून मसाले उद्योगासाठी एक रेफरन्स मिळाला आणि श्री स्वामींच्या कृपेने त्या व्यक्तीने एकदाही मला समोर न भेटता कुठलाही ॲडव्हान्स न मागता मला लागणारे सगळे जिन्नस किंवा कांडप मशीन वरती ते बारीक करून देण्यासाठी मदत केली मी घरी पॅकिंग करून ते प्रॉडक्ट घरोघरी जाऊन देऊ लागले व्यवसायाची सुरुवात झाली कशाचाच विचार केला नाही नक्की आपण कुठे आणि कसे विकणार? कितपत लोकांना आवडेल? त्यावेळी मार्केट सर्वे नसल्यामुळे मला फारशा किमती देखील नीट माहित नव्हतं पण थोड्याच कालावधीत शिकून आणि लोकांची गरज ओळखून माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही.
अर्थातच या सगळ्यांमध्ये मला अगदी मोठी साथ जी कोणी दिली असेल ती म्हणजे माझ्या मुलांनी.
या सगळ्यांमध्ये कागदोपत्री ही मी पूर्तता केली जसे की शॉप ॲक्ट फूड लायसन उद्योग आधार इत्यादी.
त्यामुळे यावर्षीही आता अश्विनी गृह उद्योग मध्ये अजून काही नवीन बदल किंवा नवीन प्रॉडक्ट नक्कीच बघायला मिळतील
मी शतशः ऋणी आहे त्या सर्व प्रिय जणांची ज्यांनी मला मनापासून आणि भरभरून साथ दिली
अशीच साथ आणि प्रगती या अश्विनी गृह उद्योग ची वर्षानुवर्ष होऊ दे हेच श्री स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏼